मयुरी हगवणे प्रकरण चाकणकरांचे पोलिसांकडे बोट; कारवाईच्या मागणीचे फडणवीसांना पत्र

Chakankar points finger at police in Mayuri Hagavane case; Letter to Fadnavis demanding action : पुण्यामध्ये घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील महिला आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे विविध नेत्यांसह सामाजिक स्तरावरून देखील महिला आयोगावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली जात आहे.
मोठी बातमी! राजस्थानमध्ये Operation Shield रद्द; कारण काय?
या दरम्यान आता वैष्णवी हगवणे त्याचबरोबर तिची जाऊ मयुरी हगवणे या दोन्ही प्रकरणांमध्ये आपली भूमिका योग्य न बजवणाऱ्या महिला आयोगाने आता थेट पोलिसांकडेच बोट केले आहे.कारण आता महिला आयोगाकडून मयुरी हगवणे प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी पोलिसांवरच कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.
पुण्यातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल होणार; बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
या पत्रामध्ये म्हटलं आहे की, राज्य महिला आयोगाने मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज दि. २८ मे २०२५ रोजी पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी अहवाल सादर करत पोलीस तपासाची माहिती दिली आहे. आवश्यक पोलीस तपासानंतर महिला अत्याचारासंबंधीच्या या प्रकरणी गुन्ह्याची निर्गती ६० दिवसात होणे अपेक्षित असताना दोषारोपपत्र विहित मुदतीत मा. न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याची गंभीर बाब अहवालात निदर्शनास आली आहे. दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेल्या विलंबाची गृह विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
नवीन पेन्शन योजना…, गुंतवणूकदारांना मिळणार बोनस, टॉप-अप आणि PPF सारखे फायदे; जाणून घ्या कसं
तर ज्यावेळी वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर मयुरी जगताप हे माध्यमांसमोर आली. तिने तसेच तिच्या आईने काही महिन्यांपूर्वीच महिला आयोगाकडे आपल्या अशा प्रकारे त्रास होत असल्याची तक्रार केली होती. यावर आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रूपाली चाकणकर यांनी आपण या पत्रावर कारवाई करत पुणे पोलिसांकडे हे प्रकरण सुपूर्द केल्याचे सांगितलं होतं.
निलेश चव्हाण आरोपी नाहीच, त्यानेच वैष्णवीच्या बाळाची काळजी घेतली; हगवणेंच्या वकिलांचा युक्तिवाद
पण या प्रकरणावर कारवाई झाली का? त्याचबरोबर या कारवाईने संबंधित पीडित महिला समाधानी आहे का? किंवा न्याय झाला आहे का? या सर्व गोष्टी तपासणं अंतिमतः महिला आयोगाचे काम आहे. मात्र महिला आयोग केवळ आलेल्या तक्रारी पुढे पाठवण्यासाठी काम करतो का? असंच काहीस चित्र सध्या दिसत आहे. त्यानंतर आज चाकणकरांनी पडणाऱ्या पत्रामध्ये देखील त्यांनी पुणे पोलिसांकडेच बोट दाखवलं आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये जेवढी चूक पोलिसांचे आहे तेवढीच चूक हे आयोगाची देखील आहे.